गेले वाहून सगळे
जे जे शब्द निमित्त त्यासाठी होते
तुटले सगळे बंध
नकळत मनाने जे बांधले होते
व्हायचे होते हे असेच
माहित होते तिलाही
का तिचे मन मात्र तिला
या वाटेवर चालवत होते
शब्द माझे कलंकित
मलाच वाटू लागले
मन कोणाचे अंकित
का होऊन गेले
आता हा अश्रुपात
थांबवू कसा मी
पुन्हा नव्याने श्वास
घेऊ कसा मी
निमित्त समजून सगळे
विसरेन मी आघात सगळे
खुणा ठेवून काही या रस्त्यावर
होतेय एक मन आता वेगळे
No comments:
Post a Comment