ठरवायचे पुन्हा पुन्हा कितीदा
हा संघर्ष आता जिंकायचा
नाही हरायचे मनापुढे
नाही प्राण कंठाशी आणायचा
पण का कुणास ठावूक
तुझ्या दुराव्याचे निमित्त होते
आणि मग जगण्याचे
सगळे बळ च क्षणात गळून पडते
ठरवायचे पुन्हा पुन्हा कितीदा
खूप काही अजून करायचे आहे
आयुष्याच्या शिखरांना गाठायचं आहे
तू नाहीस तर सगळे निरर्थंक वाटते
का कसे जगण्याचे निमित्त
तुझ्याजवळ येऊन संपते
No comments:
Post a Comment