सरी पावसाच्या ,
आनंद घन घेऊन आल्या
तडकलेल्या क्षणांना
तृप्त तृप्त करून गेल्या
का झाल्या सरींचा वादळी पाउस असा
अश्रूंच्या पुराचं निमित्त होऊन गेल्या
ती ज्योत उजळली
अंधारल्या मनाला
प्रकाशाची सोबत ती
दिलासा अन प्रेरणा हि
वणवा तिच्या पेटण्याचा का पसरला
निमित्त मानून विध्वंसाचा तिलाच दोष दिला
शब्दांना नाही छंद
हृदयांशी खेळण्याचा
त्यांना नाही गंध
कुणा वेदना देण्याचा
आर्त साद हृदयाची , वेदना अश्या व्यक्त झाल्या
निमित्त झाले शब्दांचे अन भावनांचा गुंता झाला
No comments:
Post a Comment