भेटणे हे शेवटीचे , काढली ती खोड का रे ?
गायले ते पेललेना ,गीत राही गोड का रे ?
सोडले मी मोजणे जा , तोडलेल्या अंकुराना
खोल माती वेदनांची , आसवांचे मोड का रे ?
सांधणे आता नको ते , जोडणे पुन्हा न आता
अंतरी धागा न दोरा , फाटली ती जोड का रे ?
मी उसासे बांधलेले , श्वास काही ठेवलेले
बंधने नाही कशाची , प्राण गाती सोड का रे ?
ठेव नाही कोणतीही , भाव नाही घाव नाही
तोडले गोडीत सारे , तोडण्या या ' तोड ' का रे ?
ताणलेले दोर होते , ना कळाले का मलाही ?
ठेवले जाता पुरावे , बोल हाती फोड का रे ?
........... अंतर्नाद ( मनीषा )
No comments:
Post a Comment