आपल्यासारखाच प्रत्येकाचे आयुष्य असत का ? प्रत्येकाच्या भावना वेगळ्या ,आवडी वेगळ्या ,दुखे वेगळी , इच्छा वेगळ्या त्यांना सामोरे जाण्याची प्रेरणा हि वेगळी ,
पण सर्वांमध्ये असणारा एक समान धागा मला ओढ लावतो आय्ष्याला जाणून घेण्याची,एका मैत्रिणीच्या बाबतीत घडलेला एक प्रसंग ,रिक्षातून प्रवास करत असताना एका थांब्यावर एका बाईने रिक्षा थांबवला , पोशाख आणि अवतारावरून परिस्तिथी जेमेतेम असल्याचे समजते, रिक्षात बसल्यानंतर संपूर्ण प्रवास शांत , तीच ठिकाण आले ती उतरली आणि चालू लागली , रिक्षावाला आवाज देऊन म्हणाला " बाई पैसे ?" ती बाई गंभीर आवाजात म्हणाली " पैसे नाहीत ", माझ्या मैत्रिणीला वाटले कि आता काहीतरी वाद होणार पण ती काही बोलण्याचा आतच रिक्षावाला म्हणाला " ठीक आहे , असू द्या " आणि चालू लागला त्या बाईने पुन्हा आवाज दिला " दादा थांब ", तिने तिच्या कडे असलेला एकमेव वस्तू कदाचित .....पायातली एक जोडावी काढून दिली . रिक्षावाला म्हणाला " बाई माणुसकी अजून शिल्लक आहे जगात , असू दे ." असे म्हणून त्याने रिक्षा सुरु केला , मैत्रीण म्हणाली " एवढ्या उन्हात तुम्ही एका सीट साठी किती वेळ वाट पाहत होता आणि आश्चर्य तुम्ही किती सहज तुमची कमाईसोडून दिलीत " रिक्षावाला म्हणाला " अहो ताई, मला उन्हात बसलेल्या चटक्या पेक्षा त्या बाईचे होरपळणे जास्त जाणवलं मला " थांबा आला आणि माझी मैत्रीण उतरली तिच्याबरोबर तिने त्या बाईचे हि पैसे देऊ केले पण त्या रिक्षावाल्याने घेतले नाही ,
तिने मला भेटल्याबरोबर हे सगळ सांगितलं आणि म्हणाली " कि आपण किती व्यस्त झालो आहोत कि
No comments:
Post a Comment